विशाळगडl Msin_FrŞamu NYycvg %vSs1


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विशाळगड
Surviving Structure on Vishalgad.jpg
विशाळगडावरील एक संरचना
नाव विशाळगड
उंची 1130 मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी.
ठिकाण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव विशाळगड,कोल्हापूर
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {{{स्थापना}}}


विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे.

अनुक्रमणिका

  • कसे जाल?
  • इतिहास
  • गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
  • गडावरील राहायची सोय
  • गडावरील खाण्याची सोय
  • गडावरील पाण्याची सोय
  • गडावर जाण्याच्या वाटा
  • मार्ग
  • जाण्यासाठी लागणारा वेळ
  • १० संदर्भ
  • ११ हे सुद्धा पहा

कसे जाल?[संपादन]

http://fortsofshivrai.com/sites/default/files/u1/vishalgad1.jpg पुण्याहुन कराडला गेल्यालर पुढे पाचवड फाटा,तेथुन उजवीकडे वळल्यावर २० किमी वर शेडगेवाडी गाव लागते.डावीकडे वळल्यावर ४ किमीवर केकरुड गाव लागते.नंतर नदीवरील पुल ओलांडल्यावर लगेच उजवीकडे वळा.केकरुड घाट,मलकापुर ला कोल्हापुर रत्नागिरी हायवे वर आंबा गावातुन डावीकडे विशाळगडाकडे वाट जाते..

इतिहास[संपादन]

विशाळगडाची उभारणी इ.स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स.१४५३ च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलिक उत्तुजार होय, त्याने प्रथम पन्हाळा किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलिक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलिक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलिक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलिक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.

पुढे शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले. हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे. आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी करून घॆतलेल्या सुटकेमुळे या किल्लयाचे नाव अजरामर झाले. आणि यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे या किल्लयाचे नाव झाले. पुढे शिवाजी राजांचा मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच,पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले.

कोल्हापूरच्या छत्रपतींचे पंतप्रधान पंत प्रतिनिधी हे विशाळगड येथे राहत असून, ते विशाळगडाचे जहागीरदार होते. त्यानंतर ते मलकापूर येथे राहावयास गेले.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

वाहनतळावरून गडाकडे जाण्यासाठी एकच वाट आहे. वाटेवरील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण सुरू होते. चढताना ढासळलेला बुरूज दिसतात. साधारण ३० मिनिटे चालल्यानंतर माणूस गडाच्या सपाटीवर येऊन पोहोचतो. गडावर "हजरत मलिक रिहान' यांचा दर्गा आहे. दरवर्षी इथे हजारो भाविक भेट देतात. याशिवाय गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. काळाच्या ओघात किल्ल्याची बरीच पडझड झाली असून सध्या गडावर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. किल्क्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई यांचे स्मारक आहे.

गडावरील राहायची सोय[संपादन]

गडावर मलिक रेहान साहेब नामक अवलियाचा दर्गा आहे. हे एक जागृत देवस्थान असून दररोज बरेच मुस्लीम व हिंदू भावीक या दर्ग्याला भेट देतात. त्यामुळे गडावर भाविकांना किंवा पर्यटकांना निवासासाठी खोल्या सहज आणिणी वाजवी किंमतीत मिळतात.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

गडावर मलिक रेहान दर्ग्याच्या अवतीभवती छोट्या मोठ्या भरपूर खानावळी व हॉटेले असू तिथे पर्यटकांच्या आवडीप्रमाणे शाकाहारी किंवा मांसाहारी भोजन उपलब्ध होऊ शकते.

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

गडावर पिण्याच्या पाण्याची एकच विहीर असून ती देखील उन्हाळ्यात आटते. उन्हाळ्यात स्थानिक ग्रामस्थ पांढरेपाणी किंवा आंबा गावातून पाणी आयात करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये इतर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसते. परंतु पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष अडचण नाही. गडावरील बहुतेक दुकानांमध्ये किंवा हॉटेलात पिण्याचे पाणी मिळू शकते.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

मार्ग[संपादन]

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथून गजापूर मार्गे थेट विशाळगड्याच्या पायथ्यापर्यंत खाजगी वाहनाने जाता येथे अथवा आंबा येथून विशाळगडावर जाण्यासाठी वेगळा घाट रस्ता आहे. कोल्हापूरामधून या मार्गे कर्नाटक परीवहन मंडळाच्या दिवसातून चार बसेस विशाळगडापर्यंत जातात. दिवसातून काही वेळेस मलकापुरातून गजापूरमार्गे देखील एस.टी. महामंडळाच्या काही बसेस विशाळगडावर जातात.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

कोल्हापूर वरून गाडीने 3 तास

संदर्भ[संपादन]

  • सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
  • डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
  • दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
  • किल्ले - गो. नी. दांडेकर
  • दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
  • ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
  • सह्याद्री - स. आ. जोगळेकर
  • दुर्गकथा - निनाद बेडेकर
  • दुर्गवैभव - निनाद बेडेकर
  • इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
  • महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
  • गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
  • किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर
  • गडदर्शन - प्र. के. घाणेकर
  • गड आणि कोट - प्र. के. घाणेकर
  • इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
  • चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
  • साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
  • सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर
  • मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर
  • दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर
  • गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर
  • ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
  • ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
  • ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर

हे सुद्धा पहा[संपादन]

  • भारतातील किल्ले